सरचिटणीस नामदेव ताकवणे यांची कामातून दिसते तळमळ ; वरवंड येथे नोकरी महोत्सवा’चे आयोजन, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
दौंड,( हरिभाऊ बळी ) ता. १५ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली गरजू बेरोजगार युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ९ वा. सिद्धीराज मंगल कार्यालय पुणे – सोलापूर रोड वरवंड ता. दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नोकरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पञकार परिषदेत दिली.
दौंड तालुक्यात पाणी आणि रस्ते प्रश्न जितके महत्त्वाचे तितक्याच महत्वाचा प्रश्न म्हणजे तालुक्यातील बेरोजगारी तालुक्यातील २० टक्के सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. सुशिक्षित युवकांवर बेरोजगारी च्या संकटाशी सामना करण्याचे आव्हान आहे. अशा गरजू युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी युवक युवतींनी दहावी ते बारावी पास, पदवीधर पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवारी वरवंड येथे जास्तीत जास्त युवकांनी फाॅर्म भरुन या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा, ४० हून अधिक मोठ्या उद्योगांमध्ये युवक युवतींना नोकरीची संधी मिळणार आहे. असे आवाहन नामदेव ताकवणे यांनी पञकार परिषदेतून केले.
दौंड तालुक्यात युवक आघाडीवर असतांना देखील युवकांचा बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यात कोणतीही प्रगती नाही. तरुणांचे भविष्यात आणि आयुष्यात आलेल्या अंधारात एक दिवसतरी सुर्याची किरणे पडतील या आशेने तरुणपिढी वाट पाहत आहे. तालुक्यात सहकारी साखर कारखाना, औद्योगिक वसाहत, वि. का. सोसायटी, शिक्षण संस्था, इत्यादी ठिकाणी युवकांना नोकऱ्या मिळत होते. ज्यांना मिळाले त्यांचे कल्याण झाले ? काही कालांतराने या संस्थांना महत्त्व आल्याने नोकऱ्या मिळणे अवघड झाले. स्थानिक पेक्षा इतर तालुक्यातील, जिल्ह्यातील युवकांना नोकऱ्या माध्यमातून फायदा झाला. पण तालुक्यातील स्थानिक तरुणपिढींचे नुकसान झाले. चांगले शिक्षण व बेरोजगारी या मुद्द्यावर आजपर्यंत कोणत्याही सत्ताधारी नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे तालुक्यात युवक आघाडीवर असतांना देखील तालुक्यात दर्जेदार शिक्षणाची कमतरता तालुक्यात भेडसावत आहे. यासोबतच नोकरी व उद्योगधंद्यांची कमतरता हा प्रश्न आजही तितकीच गंभीर आहे. शिक्षक कितीही होवु त्याला किंमत नाहु. मध्यंतरी मेक इन इंडीया त्यानंतर मेक इन महाराष्ट्र झाला त्यानंतर मेक इन दौंड तालुका झाले तरीही तालुक्यातील युवकांच्या पाट्या कोऱ्याच..! याशिवाय लोकप्रतिनिधी गेल्या ४० वर्षात कुठलाही मोठा उद्योग या मतदारसंघात उभारु शकले नाहीत. जेणे करून तालुक्यातील युवक हा तालुक्यातच नोकरी किंवा व्यवसाय करु शकेल. विकासाच्या नावावर केवळ शासकीय इमारती, तलाव, आणि आश्वासन आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी पिण्याच्या पाण्यावर आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर मतदारांच्या भावनाशी खेळायचे हे सगळे मतदारांना पाहायला मिळत आहेत अशी घणाघाती टीका नामदेव ताकवणे यांनी चौफुला येथे रविवारी झालेल्या पञकार परिषदेत केली.
दौंड विधानसभा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर “तालुक्यातील जातीय समीकरण या वेळी काहीही असले तरी दौंड विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न हा पाणी आणि बेरोजगारी आहे. युवकांपुढे तो प्रश्न जातीपातीच्या राजकारणापेक्षा मोठा असणार आहे. नोकरीसाठी मतदारसंघातील अनेक तरुणांना इच्छा नसताना गाव सोडावे लागले. अनेक वृद्ध आईवडिलांना त्यांच्या मुलांपासून दूर व्हावे लागले. तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी कधी गांभीर्याने विचारच केला नाही किंवा यासाठी कुठलेही ठोस पावले उचलली नाहीत हे येथील तरुणांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे दौंड विधानसभा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर राहिला आहे. :- नामदेव ताकवणे, (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)