अण्णापूरच्या रयत हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेत मारली बाजी

राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या एनएमएमएस शिष्यवृत्ती मध्ये विद्यालयाने बाजी मारली आहे.

विद्यालयाचे १३विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून दोन विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची शिष्यवृत्ती तर ७ विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळाली आहे .केंद्रीय शिष्यवृत्ती प्रतिवर्षी १२०००प्रमाणे एकूण ४८ हजार रुपये दोन विद्यार्थ्यांना ,तर सारथी शिष्यवृत्तीचे ९६००प्रमाणे चार वर्षात ३८ हजार ४०० रुपये सात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.या परीक्षेत जान्हवी रासकर,कृष्णा रासकर यांना केंद्रीय शिष्यवृत्ती. तर सार्थक कुरंदळे,गौरव वाळुंज,सार्थक वाळुंज,सानिका कुरंदळे,सार्थक सरड,सक्षम कुरंदळे, सार्थक वारघडे यांना सारथी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

वैष्णवी जाधव,कल्याणी कुऱ्हे,अविष्कार जाधव,ऋतुजा धीवर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुख्याध्यापक भास्कर वाबळे,उपशिक्षक बबन गुंड,उपशिक्षिका धनश्री ताठे, उपशिक्षिक वजीरोद्दीन काझी यांचे मार्गदर्शन लाभले विद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन विकास समिती, गावचे सरपंच उपसरपंच व समस्त ग्रामस्थ अण्णापूर त्याचप्रमाणे शाळेच्या विविध समित्यांच्या सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें