लोणीकंद: (ता.हवेली) जमिनींचे भाव गगनाला भिडल्या मुळे आजच्या या युगात संपत्तीच्या मुद्द्यावरून बहीण भावात वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं, अनेक कारणांने नात्यात कटूता येते त्यामुळे हक्कसोडपत्र करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. पण समाजासाठी आपण काही देणे लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत लोणीकंद गावचे माजी सरपंच कै.आदिनाथ आनंदराव कंद व त्यांचे बंधू कै.उत्तम आनंदराव कंद यांच्या मुलींनी आपल्या भावांना स्वखर्चाने वडिलोपार्जित संपत्तीचे हक्कसोड पत्र लिहून देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी कडून बहीनींचे कौतुक केले आहे, तसेच बहीणींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांइतकाच मुलींचा अधिकार असतो सदरची मिळकत वडिलोपार्जीत मालकी हक्काची असुन कै.आदिनाथ आनंदराव कंद यांचे दि. २४.०८.२०१० रोजी निधन झाले. त्यांना दिंगबर आदिनाथ कंद,जनाबाई आदिनाथ कंद, कविता दत्तात्रय बोडके, ज्योती पोपट मांजरे, मंजुश्री विशाल घुले असे वारस आहेत तसेच आदिनाथ कंद यांचे बंधू कै. उत्तम आनंदराव कंद यांचे दि. २६.०५.२००६ रोजी निधन झाले त्यांना शालन उत्तम कंद, मयूर उत्तम कंद, वैभव उत्तम कंद व मयुरी उत्तम कंद असे वारसदार आहेत, अशा या कुटुंबातील बहिणींनी भावांना स्वखर्चाने हक्कसोडपत्र करून दिले आहे.
वडिलांच्या निधनानंतर आमच्या भावांनी कोणत्याच गोष्टीत आम्हाला काहीच कमी पडू दिलं नसल्याने तसेच समाजासाठी आपण काही देणे लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी व समाजापुढे एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी भावांना स्वखर्चाने हक्कसोड पत्र लिहून दिल्याचे कविता, ज्योती, मंजुश्री व मयुरी या बहीणींनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.