ता.१०;शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, विकास लवांडे, संजय सातव,भारती शेवाळे, राजेंद्र नागवडे,विश्वास ढमढेरे, पोपट शेलार, वैभव यादव,संभाजी फराटे, नरेंद्र माने, सुभाष कळसकर, सुदाम साठे, कांतीलाल होळकर,संजय कळसकर,अनिल पवार, संदीप भोते, दिलीप मोकाशी आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले की, पहिल्यांदा यांच्या काळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आले. एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. देशाचे नेते शरद पवार राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे काळ्या दगडावरची रेघ आहे. सत्तेत सहभागी न झाल्याने त्यांच्या कारखान्याला सरकारने कर्ज दिले नाही त्यामुळे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला कर्ज देण्याची व्यवस्था करतो, अशोक पवार हे जिल्ह्यातील एकमेक निष्ठावंत आमदार आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेत पाठवण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागरीकांना केले.
मी सत्तेत सहभागी झालो नाही म्हणून आपल्या कारखान्याचे कर्ज अडवले गेले,पवार साहेब माझ्या हृदयातील स्थान आहे, त्यांच्यावर निष्ठा असल्याने मी त्यांच्या सोबत राहिलो आहे.१९८० साली ५२ आमदार पवार साहेबांना सोडून गेले त्यातला एकही परत निवडून आला नाही.आता ४२ आमदार गेले आहेत,राज्यातील जनता त्यांचा बरोबर कार्यक्रम राबवणार आहे.माझ्या मुलाबाबत काल घडलेला प्रकार निंदनीय व घृणास्पद आहे,लोकशाही मार्गाने निवडणुका जिंका मात्र अशाप्रकारे आमच्या कुटुंबाची कुणीही बदनामी करू नये, आमदार अशोक पवार यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले.