उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, श्रीरंग तांबे यांचे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन 

पुणे : (वार्ताहर)

राज्यात व जिल्हातील शेतकऱ्यांना मोबाईल अपच्या सहाय्याने स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या शेतात जाऊन आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी शेतकऱ्यांना परिपत्रक काढून अहवानाद्वारे केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें