वडगाव रासाई ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी दि. ३१ रोजी वादळी होणारी ग्रामसभा सभा सरपंच सचिन शेलार यांच्या आव्हानामुळे शांततेत पार पडली.व ग्रामसभेमध्ये महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन ठराव एकमताने मंजूर केले.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सचिन शेलार होते. उपसरपंच कौशल्य शेलार, घोडगंगेचे संचालक उत्तम सोनवणे, सोसायटीचे अध्यक्ष सचिन पवार, काकासाहेब खळदकर, जयराम खळदकर, वीरेंद्र शेलार, कुंडलिक शितोळे, उद्धव शेलार, पोलिस पाटील, उत्तम शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष विदुर शितोळे, गोविंद शेलार, बाळासाहेब ढवळे , सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी , आरोग्य विभागाचे डॉक्टर सहकारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते
ग्रामसभेत व्यापारी गाळाधारकांनी अनामत रक्कम न भरल्याने त्यांच्यावर कारवाई करणे, गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या काट्या काढणे, बेकादेशीर ट्रस्ट रद्द करणे, बंद पडलेली पाणीपुरवठा योजना चालविण्यास देण्याबाबत मार्गदर्शन करणे, गावातील साखर कारखान्याच्या कामगारांची व शेतकऱ्यांची एफआरपी रक्कमेबाबत चर्चा करणे, नवीन नियमानुसार घरपट्टी करआकारणी करणे, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत विशेष ग्रामसभा पत्रावर करणे, रोजगार हमी आराखडा, १५ व्या वित्त आयोगातील निधीचा खर्च, अंतर्गत गटारलाईन इत्यादी कामाचे स्वरूप पत्रिकेवर वाचन ग्रामविकास अधिकारी राजाराम रासकर यांनी करून ठराव एकमताने मंजूर केले.व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली, तर रत्नकांत खळदकर यांनी आभार मानले.
ग्रामसभेचे अध्यक्ष सचिन शेलार यांनी आपल्या प्रस्तावित भाषणामध्ये सर्वांना विनंती केली ज्या नागरिकाला प्रश्न विचारायचा आहे त्याने स्वतः स्टेज वरती येऊन माइक वरती प्रश्न विचारण्यात यावा त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली जातील व त्या प्रश्नाचे निरसन करण्यात येईल. असे आव्हान विरोधकांना व इतर ग्रामस्थांना केल्यामुळे वादळी होणारी सभा शांततेत पार पडली. या सभेत संपूर्ण श्रेय विरोधक व ग्रामस्थांना जाते या ग्रामसभेच्या वेळी प्रशासनाचा चोख बंदोबस्तही होता असे सरपंच सचिन शेलार यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.